Sunday, July 7, 2013

सूर

कसं गावं बरं सांग माझ्या आयुष्‍याचं गाणं?
सावलीच्‍या मागेमागे जिथं उन्‍हाचं गं येणं
अस्‍वस्‍थतेच्‍या त्‍या काट्यांचं उरी बोचत ते जाणं
निःश्‍वासांच्‍या उंब-यावर पुन्‍हा भयाचं भेटणं

असा चुकार हा श्‍वास उरी अडकत जाई
माझ्या आठवणीही अशा जे कधी घडलंच नाही
माझ्या पाझरांची नदी अशी पोरकीच वाही
घर शोधत पाखरु नभी उडतच राही

ओंजळीनं माझ्या वाट पदराची ती पाहिली
सुन्‍या सुन्‍या या मनानं विराणी किती गायली
माझ्या स्‍वप्‍नांना गेले ते तडे असे ठायी ठायी
मन भांबावले वेडे चिते हेही काही बाही

तुझ्या जगाची सोडली सखे केव्‍हाची मी साथ
रंगवू कसं ते चित्र ज्‍यात नसे तुझी बात?
किती ढोल मी हा पिटू माझ्या आनंदी जगाचा?
किती खोल हा कोसळू थांग लगे नही डोहाचा?

माझी उसनी पावलं मना घे तू समजून
माझ्या अस्‍तराच्‍या खाली भीती बसली साचून
कवितेचे शब्द सारे गेले मुके गं होऊन!
कसा शोधू मी तो सूर कुठं गेला हरवून?

No comments:

Post a Comment