सपना तू दिलेल्या प्रतिक्रियेत सकारात्मक विचार मांडला आहेस. आणि ते बरोबरच आहे. मी जे लिहीलं होतं ते काहीसं नकारात्मक भासत होतं. आता मला काही नकारात्मकता मांडायची नव्हती़ पण मनातली अस्वस्थता ही एका विशिष्ट स्वरूपातली सभोवतालची परिस्थिती पाहिल्यामुळे (जी खरोखर नकारात्मकतेच्या जवळ जाणारी आहे) निर्माण झालेली असल्यामुळे त्यात त्या नकारात्मकतेचा अंश असणारच होता़ असो; त्या दिवशी लिहील्यानंतर मनात कुठेतरी वाटतच होतं की आपलं काहीतरी लिहायचं राहून गेलंय म्हणून. जेव्हा ते सगळं लिहीत होतो, तेव्हाही ही सकारात्मकता मनात डोकावत होती. हे सगळं लिहावंसं वाटत होतं. पण नंतर लिहीण्याच्या ओघात ते बाजूला सारलं गेलं. तरीही मला या गोष्टीची आठवण करून दिल्याबद्दल तिचे धन्यवाद.
त्या प्रवासात ही सकारात्मकता दिसतेच. निश्चित दिसते. मदत करण्यासाठी लोकं पुढे येत असतात़ कुणी काही विचारलं, मदत मागितली, कुणी कुठे अडलं तर मदत करायला माणसं आनंदानं पुढं सरसावतात़ आता कालचीच गोष्ट घ्या! रात्री मी दादरहून बोरिवली स्लो पकडली़ बरीच गर्दी होती़ मला कशीबशी जागा मिळाली़ आत एक जोडपं बसलं होतं. त्यांच्याकडे मोठ्या बॅग होत्या़ कदाचित मुंबईत नवीन असावेत, कारण उतरायचं होतं अंधेरीला आणि माटुंगा जाताच उठून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले़ त्यांची घाई पाहून काहींनी त्यांना ‘कुठे उतरायचं’ असं विचारलं. तर ते म्हणाले, ‘अंधेरीला’. हे ऐकून माझ्या शेजारचा ‘भय्या’ म्हणाला,‘‘ अरे भाई, अभी तो बहुत टाईम है’. आप खाली फोकटमे आगे आ गए़ अभी तो बहुत स्टेशन जाना बाकी है’’. मग तो त्यांना कुठं उभं रहा म्हणजे धक्के लागणार नाही, बॅग इथं ठेवा, भाभीजी तुम्ही माझ्या जागेवर बसा असं बरंच काहीबाही सांगत राहिला. गम्मत म्हणजे त्या बाईनं उतरताना माझ्या शेजारच्या माणसाला ‘चलो भय्या, चलते है’ असं म्हटलं. हा चांगुलपणा प्रवासात दिसतोच. तो नजरेआड करणं शक्य नाही.
सगळीच माणसं ही मनातून चांगलीच असतात, असा माझा विश्वास आहे़ कुणा नवख्या व्यक्तीला माहिती हवी असेल, कुणी वाट चुकला असेल तर मदत ताबडतोब मिळते असा माझा अनुभव आहे़ ही मदत त्यांच्या आवाक्यातली असते आणि आवाक्यातल्या गोष्टींसाठी मदत करायला माणूस तयार असतो. म्हणूनच फिरताना मला कधीच अडचण आली नाही. परिचयाच्या परिसरापेक्षा अपरिचित परिसरात जाताना मी फार उत्सुक असतो. मी बिनधास्तपणे लोकांना एवढीएवढीशी गोष्ट विचारत जातो. दुकानदारांपासून पोलिसांपर्यंत. सगळ्यांनाच! मला हव्या त्या जागा पटकन सापडतात. ही माणसं जेव्हा मदत करतात तेव्हा फार बरं वाटायचं. काही माणसं तर पत्ता दाखवायलाही यायची़ मग त्यांना त्रास दिल्याबद्दल अवघडल्यासारखं वाटायचं. मदत मिळाल्यावर चांगलं वाटण्याची ही कोणती भावना आहे? प्रथम कळायचंच नाही.
हाच तो चांगुलपणा.
माणसात असलेला हा चांगुलपणा दिसला की फार बरं वाटतं. पूर्वी रात्रीच्या वेळी आलेल्या वाटसरूची राहण्याची, जेवणाची सोय व्हायची, असं चित्रपट, कथा, कहाण्यांमधून पाहिलंलं-ऐकलेलं आहे़ हा चांगुलपणाच होता की! तो जरी आपल्या संस्कृतीचा भाग असला तरी त्याचा पाया या चांगुलपणावरच आधारलेला होता असा माझा समज आहे. आज तो चांगुलपणा पूर्वीइतक्या सहजपणे दिसत नाही. म्हणूनच तो पाहण्याची मनात अस्पष्ट इच्छा असावी आणि ती पूर्ण झाल्यावर मनाला बरं वाटत असावं.
आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मनावर परिणाम नक्कीच होतो. पूर्वी अशा घटना किंवा त्यांना कारणीभूत असणाऱ्या गोष्टी संख्येने कमी होत्या. आज त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मग ते यांत्रिकीकरण असेल किंवा तंत्रज्ञान आणि त्यायोगे जीवनाचा वाढत असलेला वेग असेल. अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्याचीच मनावर पुटं चढतायत. हा निर्माण होणारा थर या चांगुलपणाला झाकत चाललाय. तो नष्ट होत नाही पण पूर्वीइतक्या प्रांजळपणे वरही येत नाही.
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा बऱ्याचदा मनावर परिणाम होत नाही. त्याचं कारण माणसं कोडगी झाली आहेत असा नाही. पण त्यांच्या मनापर्यंत त्या संवेदना पोहोचतच नाहीत. घोटाळे घडतात पण त्यांचं आता काहीच वाटत नाही. का? तर आम्ही भरपूर घोटाळे पाहिलेत हो! आता घोटाळे होणं, जनतेच्या पैशांचा अपव्यय होणं हे गंभीर नाही का? पण हा आधीच्या अनुभवांचा मनावर झालेला परिणाम. आता आम्हाला त्यांचं काहीच वाटत नाही. हा झाला एक भाग, पण आयुष्याला आलेला सध्याचा वेगही डोळ्याआड करून चालणार नाही. इथं ‘सेंट्रीफ्यूगल फोर्स’चं उदाहरणं योग्य वाटतं. एखाद्या भांड्यात पाणी ठेवलं आणि ते भांडं जोरात गरागरा फिरवलं तर काय होतं? त्यातलं पाणी त्या वेगासोबत भांड्याच्या कडेला जमा होतं आणि मघाशी पाण्याखाली बुडालेला मधला भाग कोरडा होतो. ही सध्याच्या वेगचक्रात अडकलेल्या मनांची अवस्था आहे. एक तर ती कोरडी आहेत किंवा होत चाललीयत.
हे सगळं लिहीत असताना मनं स्वत:लाच प्रश्न करतं की हे सगळ्यांसोबतच घडतं का? याचं उत्तर अर्थात नाही असं येईल. हे सगळं कदाचित पन्नास टक्के लोकांसंबंधीही घडत नसेल. आपण संख्या त्याहूनही कमी घेऊ. पण हे ‘घडतंय’ हे वाईटच की! मग ते कुणा एकासोबत का घडेना. आणि जरी आज ते काही ठराविक समूहापर्यंत मर्यादीत आहे तरी उद्या त्याचं प्रमाण वाढेल याची भीती आहेच.
त्या गर्दीतून प्रवास करणं आज अगदी जिकिरीचं झालंय. मनं-शरिरं त्रास भोगत आहेत. पण तरीही माणसं परस्परांशी चांगली वागतात. तो चांगुलपणा आजही त्यांच्या ठायी आहे म्हणूनच. हा चांगुलपणाच माणसाला आपल्या माणूसपणाची आठवण करून देत रहातो. पण कधीपर्यंत? त्याचीही काहीतरी मर्यादा असेलच की! ही सारी परिस्थिती या चांगुलपणावर मात करून पुढं निघून जाईल की काय? हीच भीती त्या दिवशी लिहीताना कुठंतरी मनात होती.
दिनकर गांगल यांनी जेव्हा थिंक महाराष्ट्रची संकल्पना समजावून सांगितली तेव्हा मला त्यातला ‘चांगुलपणासाठीचं व्यासपिठ’ हा घटक आकर्षित करून गेला. त्याची खरोखर गरज आहे असं मला वाटतं. तरीही हे सगळं लिहायला सपना तुझी प्रतिक्रिया कारणीभूत ठरली. त्यामुळे तुला thanks.
त्या प्रवासात ही सकारात्मकता दिसतेच. निश्चित दिसते. मदत करण्यासाठी लोकं पुढे येत असतात़ कुणी काही विचारलं, मदत मागितली, कुणी कुठे अडलं तर मदत करायला माणसं आनंदानं पुढं सरसावतात़ आता कालचीच गोष्ट घ्या! रात्री मी दादरहून बोरिवली स्लो पकडली़ बरीच गर्दी होती़ मला कशीबशी जागा मिळाली़ आत एक जोडपं बसलं होतं. त्यांच्याकडे मोठ्या बॅग होत्या़ कदाचित मुंबईत नवीन असावेत, कारण उतरायचं होतं अंधेरीला आणि माटुंगा जाताच उठून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले़ त्यांची घाई पाहून काहींनी त्यांना ‘कुठे उतरायचं’ असं विचारलं. तर ते म्हणाले, ‘अंधेरीला’. हे ऐकून माझ्या शेजारचा ‘भय्या’ म्हणाला,‘‘ अरे भाई, अभी तो बहुत टाईम है’. आप खाली फोकटमे आगे आ गए़ अभी तो बहुत स्टेशन जाना बाकी है’’. मग तो त्यांना कुठं उभं रहा म्हणजे धक्के लागणार नाही, बॅग इथं ठेवा, भाभीजी तुम्ही माझ्या जागेवर बसा असं बरंच काहीबाही सांगत राहिला. गम्मत म्हणजे त्या बाईनं उतरताना माझ्या शेजारच्या माणसाला ‘चलो भय्या, चलते है’ असं म्हटलं. हा चांगुलपणा प्रवासात दिसतोच. तो नजरेआड करणं शक्य नाही.
सगळीच माणसं ही मनातून चांगलीच असतात, असा माझा विश्वास आहे़ कुणा नवख्या व्यक्तीला माहिती हवी असेल, कुणी वाट चुकला असेल तर मदत ताबडतोब मिळते असा माझा अनुभव आहे़ ही मदत त्यांच्या आवाक्यातली असते आणि आवाक्यातल्या गोष्टींसाठी मदत करायला माणूस तयार असतो. म्हणूनच फिरताना मला कधीच अडचण आली नाही. परिचयाच्या परिसरापेक्षा अपरिचित परिसरात जाताना मी फार उत्सुक असतो. मी बिनधास्तपणे लोकांना एवढीएवढीशी गोष्ट विचारत जातो. दुकानदारांपासून पोलिसांपर्यंत. सगळ्यांनाच! मला हव्या त्या जागा पटकन सापडतात. ही माणसं जेव्हा मदत करतात तेव्हा फार बरं वाटायचं. काही माणसं तर पत्ता दाखवायलाही यायची़ मग त्यांना त्रास दिल्याबद्दल अवघडल्यासारखं वाटायचं. मदत मिळाल्यावर चांगलं वाटण्याची ही कोणती भावना आहे? प्रथम कळायचंच नाही.
हाच तो चांगुलपणा.
माणसात असलेला हा चांगुलपणा दिसला की फार बरं वाटतं. पूर्वी रात्रीच्या वेळी आलेल्या वाटसरूची राहण्याची, जेवणाची सोय व्हायची, असं चित्रपट, कथा, कहाण्यांमधून पाहिलंलं-ऐकलेलं आहे़ हा चांगुलपणाच होता की! तो जरी आपल्या संस्कृतीचा भाग असला तरी त्याचा पाया या चांगुलपणावरच आधारलेला होता असा माझा समज आहे. आज तो चांगुलपणा पूर्वीइतक्या सहजपणे दिसत नाही. म्हणूनच तो पाहण्याची मनात अस्पष्ट इच्छा असावी आणि ती पूर्ण झाल्यावर मनाला बरं वाटत असावं.
आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मनावर परिणाम नक्कीच होतो. पूर्वी अशा घटना किंवा त्यांना कारणीभूत असणाऱ्या गोष्टी संख्येने कमी होत्या. आज त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मग ते यांत्रिकीकरण असेल किंवा तंत्रज्ञान आणि त्यायोगे जीवनाचा वाढत असलेला वेग असेल. अशा अनेक गोष्टी आहेत. या सगळ्याचीच मनावर पुटं चढतायत. हा निर्माण होणारा थर या चांगुलपणाला झाकत चाललाय. तो नष्ट होत नाही पण पूर्वीइतक्या प्रांजळपणे वरही येत नाही.
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा बऱ्याचदा मनावर परिणाम होत नाही. त्याचं कारण माणसं कोडगी झाली आहेत असा नाही. पण त्यांच्या मनापर्यंत त्या संवेदना पोहोचतच नाहीत. घोटाळे घडतात पण त्यांचं आता काहीच वाटत नाही. का? तर आम्ही भरपूर घोटाळे पाहिलेत हो! आता घोटाळे होणं, जनतेच्या पैशांचा अपव्यय होणं हे गंभीर नाही का? पण हा आधीच्या अनुभवांचा मनावर झालेला परिणाम. आता आम्हाला त्यांचं काहीच वाटत नाही. हा झाला एक भाग, पण आयुष्याला आलेला सध्याचा वेगही डोळ्याआड करून चालणार नाही. इथं ‘सेंट्रीफ्यूगल फोर्स’चं उदाहरणं योग्य वाटतं. एखाद्या भांड्यात पाणी ठेवलं आणि ते भांडं जोरात गरागरा फिरवलं तर काय होतं? त्यातलं पाणी त्या वेगासोबत भांड्याच्या कडेला जमा होतं आणि मघाशी पाण्याखाली बुडालेला मधला भाग कोरडा होतो. ही सध्याच्या वेगचक्रात अडकलेल्या मनांची अवस्था आहे. एक तर ती कोरडी आहेत किंवा होत चाललीयत.
हे सगळं लिहीत असताना मनं स्वत:लाच प्रश्न करतं की हे सगळ्यांसोबतच घडतं का? याचं उत्तर अर्थात नाही असं येईल. हे सगळं कदाचित पन्नास टक्के लोकांसंबंधीही घडत नसेल. आपण संख्या त्याहूनही कमी घेऊ. पण हे ‘घडतंय’ हे वाईटच की! मग ते कुणा एकासोबत का घडेना. आणि जरी आज ते काही ठराविक समूहापर्यंत मर्यादीत आहे तरी उद्या त्याचं प्रमाण वाढेल याची भीती आहेच.
त्या गर्दीतून प्रवास करणं आज अगदी जिकिरीचं झालंय. मनं-शरिरं त्रास भोगत आहेत. पण तरीही माणसं परस्परांशी चांगली वागतात. तो चांगुलपणा आजही त्यांच्या ठायी आहे म्हणूनच. हा चांगुलपणाच माणसाला आपल्या माणूसपणाची आठवण करून देत रहातो. पण कधीपर्यंत? त्याचीही काहीतरी मर्यादा असेलच की! ही सारी परिस्थिती या चांगुलपणावर मात करून पुढं निघून जाईल की काय? हीच भीती त्या दिवशी लिहीताना कुठंतरी मनात होती.
दिनकर गांगल यांनी जेव्हा थिंक महाराष्ट्रची संकल्पना समजावून सांगितली तेव्हा मला त्यातला ‘चांगुलपणासाठीचं व्यासपिठ’ हा घटक आकर्षित करून गेला. त्याची खरोखर गरज आहे असं मला वाटतं. तरीही हे सगळं लिहायला सपना तुझी प्रतिक्रिया कारणीभूत ठरली. त्यामुळे तुला thanks.