Monday, August 19, 2013

अंबराचा रंग

रंग उडाले आकाशी मी सांभाळल्‍या अंबराचे
शिंपल्‍यात जपलेला मोतीही न जाणे कुठे विरुन गेला?

ज्‍या झाडासाठी आणला होता मी पाऊस ओंजळीतून
मोहर त्‍याचा न जाणे अवचित कसा जळून गेला?

विस्तवांनी शिलगावलेली वाट साधी, सोपी, सरळ भासे
सुखाच्छादित वाटेवरचं होरपळणं ते टाळू कसं?

पण आता त्‍या विस्‍तवांचीही झालीय सवय मला
त्‍यांच्‍या नसण्‍यानेच कदाचित होरपळत जाईन मी

मज सुखातली बधीरता नकोशी का भासते?
अन् विरहातली समीपताही सुखाऊन का जावी बरे?

त्या अंबराचे रंग हरवलेत कि बदललेत?
का झालेत ते कुठतरी कैद? कायमचे…

कुणालाही बदलता येणार नाहीत असे…
अगदी सूर्यास्तालाही नाहीत!

हेच खरं असावं बहुधा…

No comments:

Post a Comment