२ फेब्रुवारी २०१०
काकू (माझी आजी) आजारी होती म्हणून सकाळीच मम्मी गावी गेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास ऑफिसमध्ये काम करत होतो आणि मावशीचा फोन आला. काकू गेली. क्षणभर काहीच कळेना. असं होणार हे माहित असूनही मन मानायला तयार होत नव्हतं. सूरजला फोन करून बॅग घेऊन दादरला यायला सांगितलं. विशाल शिकायला पुण्याला होता. तो रस्त्यात भेटणार होता. पहाटेच्या सुमारास पुण्याला पोहोचलो. विशालला घेऊन अकलूज गाठलं. वाटेत मामाचे सारखे फोन येत होते. कुठपर्यंत आलात? दोन -तीन गाड्या बदलत आम्ही प्रवास केला. घर जसजसं जवळ येत चाललं तसतसं मनं अधिकाधिक अस्थिर होत चाललं.
माझ्या लहानपणाच्या आठवणी जिथून सुरू होतात तिथं काकू उभी असलेली दिसते. माझं सुटीत आजोळी जाणं, तिथली दंगामस्ती, माझे खेळ, माझे हट्ट, माझं फिरणं, रडणं या सगळ्या घटनांच्या ज्या चौकटी मनात उभ्या रहातात, त्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात ती उभी असलेली आढळते. मला फिरायला घेऊन जाणं, वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालणं, माझ्यासोबत पत्ते खेळणं, रात्री चूलीवर शिजवलेलं जेवण भरवताना छान छान गोष्टी सांगणं असं खूप काही करायची ती. आमचा वाडा (अर्थात अंगण) बरंच मोठं होतं. त्यात नळ होता. त्यावेळी सहसा कुणाच्या घरी नळ नसल्याने शेजारच्या बायका आमच्याकडे सकाळी पाणी भरायला यायच्या. मला ते आवडायचं नाही. रात्री झोपताना समोरचा गण्या आणि त्याचे वडील आमच्या अंगणात अंथरूण टाकायचे. मला तेही आवडायचं नाही. शहरातून मालकी हक्कांचे संस्कार घेऊन आलेल्या मला ते सगळं रूचायचं नाही. काकूनं मला त्यांच्यासोबत कसं रहावं, आपलं आणि त्यांचा हा फरक विसरावा हे शिकवलं. तिची माझ्यावर खूप माया होती. बºयाचदा ती बोटं मोडून माझ्यावर तिची किती माया आहे हे सांगायची. मी गावी चाललो की माझ्या वडीलांना मी सुटीचे दिवस फुकट घालवू नयेत, त्यात अभ्यासही करावा असं वाटायचं. एकदा त्यांनी माझ्यासमवेत एक वही दिली आणि त्यात दररोज 3 इंग्रजी शब्द लिहीण्यास सांगितलं. मुंबईला परतल्यानंतर ते वही तपासणार होते. अर्थात मी सुटीत तसं काहीच केलं नाही. आता घरी जाऊन फटकेच खावे लागतील या भीतीने मुंबईला परत जाताना मी धास्तावलो होतो. तेव्हा काकूने माझ्याकडून ती वही काढून घेतली आणि म्हटलं, ‘‘वही गावी विसरलास म्हणून सांग.’’
मावशी कायमची गावी रहायला आल्यानंतर विशाल आणि विकास, माझे मावस भाऊ तिथं राहू लागले. लहानपणापासून वडीलांनी लाडावून ठेवल्यामुळे पहिल्या काही वर्षात त्यांचा काकूला तसा बराच त्रास झाला. विकास लहान होता आणि विशाल हट्टी. त्याची आणि माझी सतत भांडणं व्हायची. ती सोडवणं हा काकूच्या डोक्याला झालेला तापच होता. काकूनं कुणाही एकाला झुकतं माप देऊ नये, आम्हा सर्वांवर समान प्रेम करावं असं आम्हाला वाटायचं. जर तिनं एखादी गोष्ट कुणाला दिली की लगेच दुसरा विचारायचा, ‘‘त्याला का म्हणून?’’ मग ती म्हणायची, ‘‘कारण तो माझ्या गारीत (चितेत) उडी टाकायचाय.’’ एकदा तिच्या या उत्तरावर विशालनं भाबडेपणानं विचारलं, ‘‘तो गारीत उडी टाकणार आणि मी?’’ काकू म्हणाली, ‘‘आणि तू वरून बोंबलायचाय’’.
गावाला दिड-दोन महिने राहून माझी मुंबईला परतण्याची वेळ झाली की माझ्या आणि तिच्या एकत्रित रडण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. मी मुंबईला परत आलो की कित्येक रात्री माझी उशी तिच्या आठवणीनं भीजत असे. मी सर्वात जास्त पत्रं तिलाच लिहिली होती. लहानपणी खेळलेले सगळे खेळ, तिथं भेटलेली माणस, रंगलेले पत्त्यांचे डाव, किल्ल्यातली भटकंती, गारेगारवाल्याकडून घेतलेला बर्फाचा गोळा अशा माझ्या खूप काही आठवणी तिच्याशी निगडीत आहेत. माझं सगळं बालपण तिनं व्यापल्यासारखं वाटतं.
गाडीत मला असं बरंच काही आठवत होतं. आम्ही अकलूजच्या जवळ आलेलो समजल्यावर घरी जमलेल्यांनी पुढची तयारी करायला घेतली. आम्ही तिघं घराजवळ आलो. मी घरी येताना नेहमी याच वाटेन यायचो. ती कट्ट्यावर बसलेली, पाणी भरत असलेली नाहीतर मामाच्या मुलांबरोबर खेळत असलेली नेहमी दिसायची. तिला छानपैकी मिठी मारून मगच घरात जायचो. ती नेहमी जिथं दिसायची आज त्याच जागी तिचं निर्जीव कलेवर ठेवलेलं होतं. माझी काकू हीच होती का? हा प्रश्न पडावा, इतका तिचा चेहरा बदललेला होता.
माझी काकू कायमची गेली होती.
तिला सगळ्यांनी उचललं. त्यांच्यासोबत मी स्मशानाची वाट चालू लागलो. मी तिला खांदा दिला आणि इतकावेळ डोळ्यात आवरून धरलेलं पाणी धडपडून बाहेर पडलं. स्मशानापर्यंत मी हुंदके देत रडत होतो.
स्मशानात तिची चिता धडधडून पेट घेत होती.
''तो माझ्या गारीत उडी टाकायचाय''
तिचे ते शब्द आठवले आणि पुन्हा एकदा आसवं गळू लागली.
डोळे पुसत तिला नमस्कार केला.
अखेरचा.
***************
आज तिला जाऊन एक वर्ष झालं. तिच्या आठवणी मनात नक्की आहेत. पण ती आमच्यातून निघून गेल्याचं जेवढं दुखः सगळ्यांना आहे तेवढं मला नाही. कारण काकूने माझ्या डोळ्यादेखत प्राण सोडला नाही. मला गावच्या घरात तिची कमतरता भासते पण ती मरण पावली आहे असं वाटतच नाही.
असं का?
ते मला नीट सांगता यायचं नाही. मी तिचा अखेरचा क्षण पहिला नाही म्हणून? की मला तिच्याशी जोडणाऱ्या आठवणीच सुरेख आहेत म्हणून? खरंच सांगता यायचं नाही. फक्त आयुष्यातली एक खूप मोठी आणि मनाला तेवढीच जवळ असलेली जागा आता रिकामी झालीय.
तिथं आता केवळ शांतता आहे.
ती गेली तेव्हा स्मशानात होती तशी.
काकू (माझी आजी) आजारी होती म्हणून सकाळीच मम्मी गावी गेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास ऑफिसमध्ये काम करत होतो आणि मावशीचा फोन आला. काकू गेली. क्षणभर काहीच कळेना. असं होणार हे माहित असूनही मन मानायला तयार होत नव्हतं. सूरजला फोन करून बॅग घेऊन दादरला यायला सांगितलं. विशाल शिकायला पुण्याला होता. तो रस्त्यात भेटणार होता. पहाटेच्या सुमारास पुण्याला पोहोचलो. विशालला घेऊन अकलूज गाठलं. वाटेत मामाचे सारखे फोन येत होते. कुठपर्यंत आलात? दोन -तीन गाड्या बदलत आम्ही प्रवास केला. घर जसजसं जवळ येत चाललं तसतसं मनं अधिकाधिक अस्थिर होत चाललं.
माझ्या लहानपणाच्या आठवणी जिथून सुरू होतात तिथं काकू उभी असलेली दिसते. माझं सुटीत आजोळी जाणं, तिथली दंगामस्ती, माझे खेळ, माझे हट्ट, माझं फिरणं, रडणं या सगळ्या घटनांच्या ज्या चौकटी मनात उभ्या रहातात, त्याच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात ती उभी असलेली आढळते. मला फिरायला घेऊन जाणं, वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालणं, माझ्यासोबत पत्ते खेळणं, रात्री चूलीवर शिजवलेलं जेवण भरवताना छान छान गोष्टी सांगणं असं खूप काही करायची ती. आमचा वाडा (अर्थात अंगण) बरंच मोठं होतं. त्यात नळ होता. त्यावेळी सहसा कुणाच्या घरी नळ नसल्याने शेजारच्या बायका आमच्याकडे सकाळी पाणी भरायला यायच्या. मला ते आवडायचं नाही. रात्री झोपताना समोरचा गण्या आणि त्याचे वडील आमच्या अंगणात अंथरूण टाकायचे. मला तेही आवडायचं नाही. शहरातून मालकी हक्कांचे संस्कार घेऊन आलेल्या मला ते सगळं रूचायचं नाही. काकूनं मला त्यांच्यासोबत कसं रहावं, आपलं आणि त्यांचा हा फरक विसरावा हे शिकवलं. तिची माझ्यावर खूप माया होती. बºयाचदा ती बोटं मोडून माझ्यावर तिची किती माया आहे हे सांगायची. मी गावी चाललो की माझ्या वडीलांना मी सुटीचे दिवस फुकट घालवू नयेत, त्यात अभ्यासही करावा असं वाटायचं. एकदा त्यांनी माझ्यासमवेत एक वही दिली आणि त्यात दररोज 3 इंग्रजी शब्द लिहीण्यास सांगितलं. मुंबईला परतल्यानंतर ते वही तपासणार होते. अर्थात मी सुटीत तसं काहीच केलं नाही. आता घरी जाऊन फटकेच खावे लागतील या भीतीने मुंबईला परत जाताना मी धास्तावलो होतो. तेव्हा काकूने माझ्याकडून ती वही काढून घेतली आणि म्हटलं, ‘‘वही गावी विसरलास म्हणून सांग.’’
मावशी कायमची गावी रहायला आल्यानंतर विशाल आणि विकास, माझे मावस भाऊ तिथं राहू लागले. लहानपणापासून वडीलांनी लाडावून ठेवल्यामुळे पहिल्या काही वर्षात त्यांचा काकूला तसा बराच त्रास झाला. विकास लहान होता आणि विशाल हट्टी. त्याची आणि माझी सतत भांडणं व्हायची. ती सोडवणं हा काकूच्या डोक्याला झालेला तापच होता. काकूनं कुणाही एकाला झुकतं माप देऊ नये, आम्हा सर्वांवर समान प्रेम करावं असं आम्हाला वाटायचं. जर तिनं एखादी गोष्ट कुणाला दिली की लगेच दुसरा विचारायचा, ‘‘त्याला का म्हणून?’’ मग ती म्हणायची, ‘‘कारण तो माझ्या गारीत (चितेत) उडी टाकायचाय.’’ एकदा तिच्या या उत्तरावर विशालनं भाबडेपणानं विचारलं, ‘‘तो गारीत उडी टाकणार आणि मी?’’ काकू म्हणाली, ‘‘आणि तू वरून बोंबलायचाय’’.
गावाला दिड-दोन महिने राहून माझी मुंबईला परतण्याची वेळ झाली की माझ्या आणि तिच्या एकत्रित रडण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. मी मुंबईला परत आलो की कित्येक रात्री माझी उशी तिच्या आठवणीनं भीजत असे. मी सर्वात जास्त पत्रं तिलाच लिहिली होती. लहानपणी खेळलेले सगळे खेळ, तिथं भेटलेली माणस, रंगलेले पत्त्यांचे डाव, किल्ल्यातली भटकंती, गारेगारवाल्याकडून घेतलेला बर्फाचा गोळा अशा माझ्या खूप काही आठवणी तिच्याशी निगडीत आहेत. माझं सगळं बालपण तिनं व्यापल्यासारखं वाटतं.
गाडीत मला असं बरंच काही आठवत होतं. आम्ही अकलूजच्या जवळ आलेलो समजल्यावर घरी जमलेल्यांनी पुढची तयारी करायला घेतली. आम्ही तिघं घराजवळ आलो. मी घरी येताना नेहमी याच वाटेन यायचो. ती कट्ट्यावर बसलेली, पाणी भरत असलेली नाहीतर मामाच्या मुलांबरोबर खेळत असलेली नेहमी दिसायची. तिला छानपैकी मिठी मारून मगच घरात जायचो. ती नेहमी जिथं दिसायची आज त्याच जागी तिचं निर्जीव कलेवर ठेवलेलं होतं. माझी काकू हीच होती का? हा प्रश्न पडावा, इतका तिचा चेहरा बदललेला होता.
माझी काकू कायमची गेली होती.
तिला सगळ्यांनी उचललं. त्यांच्यासोबत मी स्मशानाची वाट चालू लागलो. मी तिला खांदा दिला आणि इतकावेळ डोळ्यात आवरून धरलेलं पाणी धडपडून बाहेर पडलं. स्मशानापर्यंत मी हुंदके देत रडत होतो.
स्मशानात तिची चिता धडधडून पेट घेत होती.
''तो माझ्या गारीत उडी टाकायचाय''
तिचे ते शब्द आठवले आणि पुन्हा एकदा आसवं गळू लागली.
डोळे पुसत तिला नमस्कार केला.
अखेरचा.
***************
आज तिला जाऊन एक वर्ष झालं. तिच्या आठवणी मनात नक्की आहेत. पण ती आमच्यातून निघून गेल्याचं जेवढं दुखः सगळ्यांना आहे तेवढं मला नाही. कारण काकूने माझ्या डोळ्यादेखत प्राण सोडला नाही. मला गावच्या घरात तिची कमतरता भासते पण ती मरण पावली आहे असं वाटतच नाही.
असं का?
ते मला नीट सांगता यायचं नाही. मी तिचा अखेरचा क्षण पहिला नाही म्हणून? की मला तिच्याशी जोडणाऱ्या आठवणीच सुरेख आहेत म्हणून? खरंच सांगता यायचं नाही. फक्त आयुष्यातली एक खूप मोठी आणि मनाला तेवढीच जवळ असलेली जागा आता रिकामी झालीय.
तिथं आता केवळ शांतता आहे.
ती गेली तेव्हा स्मशानात होती तशी.
tuzhi hi kakunchi athavan mala majhya sarya mansanchi athavan devun geli..."aaplyala havi asnari mansa aplya sobat rahtilach ase nahi " ase sangnare majhe papa...hech lakshat thevun konala hi dukh denyacha me prayatna hi karat nahi ......pan ka aapli mansa gelyavar ase vatate khup kahi sangaycha rahila aani khup kahi aikaychach rahun gela...... Tuzhya Kakunsathi.... maazhi hi athavan ....tula mahit aahe me chaha pit nahi pan majhi shevat chi chaha tuzhya kakunchya hathchich hoti .... tine premane( jabardastine ) dilela shevatcha godwa nahi visarnar ......
ReplyDeleteReshma Desai .....
ReplyDelete